|| *दुःखद बातमी : पांडू गेला* 💐💐💐 ||
अत्यंत जड अंतःकरणाने कळवितो आहोत कि, *पांडुरंग भाऊ राऊत,* गाव वांगणी, ता. जव्हार, जि. पालघर यांचे काल ४ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने *निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*💐🙏🏻 __________________________ आयुश ग्रुप च्या संस्थापक सदस्यांपैकी ते होते, १९९९ पासून विविध पद्धतीने आयुश च्या जडण घडणीत त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. विविध विषयावर सखोल दिशा आणि नियोजन/मार्गदर्शन साठी सहभाग असायचा. आयुश संस्था नोंदणी प्रकियेत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांनी अनेक दायित्व पार पाडली. शिक्षणाने आणि व्यवसायाने एअर इंडियात इंजिनिअर असले तरी साहित्याविषयी बरीच आवड होती. कोणत्याही वयोगटात, कोणत्याही विषयावर सहज संभाषण करून सगळ्यांना आपला आपलासा वाटणारा असा त्यांचा स्वभाव होता. सगळ्या विषयवार बरीच स्पष्ट मते असायची, आणि ते स्पष्टपणे सांगण्याची त्यांची सवय होती. त्यांनी जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीचा अनुभव घेतला. काका/काकुच्या सहकार्याने शिक्षण पूर्ण केले. शून्यातून संसार उभा करून मोठ्या कंपनीतील नोकरी, घर, गाडी सगळे वेवस्तीत सुरू असताना ते सारे सोडून कुटुंबासोबत गेले काही महिने आश्रमात काढले. (वयक्तिक सगळ्यांचा विरोध पत्करून). *पांडुरंगच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या सगळ्या कुटुंबियांना/मित्रपरिवाराला जोहार!* काही माणसे आयुष्यातून निघून जातात पण कायमचा चटका लावून जातात. वयक्तिक तसेच *आयुश टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली*💐🙏🏻 -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2G%2BD%3DsZSe%2BefoVykW62tmvARS4JzzjRBK1T1zG9uqZYw%40mail.gmail.com.